Home

संचालनात वापरता येतील असे वाक्ये

हृदयाला स्पर्श करणारी सुंदर वाक्ये प्रसंगानुरूप कार्यक्रमात वक्त्यासाठी.
सुत्रसंचालनामध्ये वापरता येतील...
    • गुलाबाला काटे असतात.असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो. असे म्हणत हसणे उत्तम .
    • वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते....
    • भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
    • मृत्यूला सांगाव. ये कुठल्याही रुपाने ये. पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे. तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
    • मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
    • वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं..
      आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावच लागतं.
    • ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.
      कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळतेय.....
    • "चांगली वस्तु", "चांगली व्यक्ती", "चांगले दिवस", यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते..
    • आशा सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं.
      अमृत मिळत नाही. म्हणून विष कधी प्यायचं नसतं...
    • जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.
      पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.
    • "चांगली माणसे", "चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत.
    • पाणी धावतं, म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.
    • नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
    • जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण... कारण ही विसरता येत नाही. अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.
    • आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते... परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.
      पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो.
    • हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे.आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.
    • तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात....
    • प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार, आणि निभावलं तर जीवन...
    • जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले. कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा, आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम.
    • आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही. सुविचार पण असावे लागतात...
      आपण कसे दिसतो. ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
    • आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो. ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
    • गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही, अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
    • तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना, चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
    • केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवध्या जगाला मोहवून टाकतो.
    • तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.
    • बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
    • ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट