Home

बोधकथा

• १) बुद्धीचा योग्य उपयोग •
  •           एक पंडित एकदा एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला, ' महाराज ! मी आवाहन करतो की, या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावे. जर मी जिंकलो तर मला हजार होन द्यावे आणि मी हरलो तर मी राज्याचा गुलाम म्हणून राहीन.' राजाने ते आव्हान स्वीकारले. वादसभा सुरू झाली. पंडित हा त्या राज्याच्या जनतेपेक्षा खूप हुशार निघाला. त्याने सर्वांना हरविले. आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार होन देण्याची वेळ आली तेव्हा राजा म्हणाला, 'पंडितजी! तुम्ही मला कुठे हरविले आहे ?' हे ऐकताच पंडित म्हणाला, 'महाराज ! आपण राजे, मी आपल्याला कसा काय हरविणार ?' राजा म्हणाला, 'अहो ! मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतो आहे. तुम्ही माझ्याशी बुद्धिबळ खेळा. जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार होन मी देईन आणि मी जिंकलो तर तुमचा शिरच्छेद करेन.' पंडिताने हे ऐकले आणि तो घाबरला. त्याला बुद्धिबळ खेळता येत नव्हते. पंडित म्हणाला, ' महाराज, मला आपल्याइतके चांगले बुद्धिबळ खेळता येणार नाही, तेव्हा मी मरणार, हे निश्चित आहे. तेव्हा माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या, अशी विनंती करतो.
              ' राजा म्हणाला, " किती पाहिजे तितके मागा देतो !" पंडित म्हणाला, ' महाराज ! पण तांदूळ देताना मला असे द्या की, या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या. म्हणजे पहिल्या घरात जर एक दाणा असेल, तर दुसऱ्या घरात दोन. थोडक्यात, दुपटीने तांदळाची संख्या वाढवून मला द्या.' राजाला हे सोपे वाटले. त्याने ते मान्य केले. राजाला गणित लक्षात आले नाही. बुद्धिबळाच्या बत्तिसाव्या घरात जेव्हा तांदूळ मोजणी चालू झाली तेव्हा तांदळाची संख्या झाली होती 214 कोटी. हे देण्यासाठी राजाचा पूर्ण खजिना रिता करावा लागणार होता. हे पाहून राजाने पंडितापुढे हात टेकले व त्याची योग्य सन्मानाने बोळवण केली.
बोधकथा
• बुद्धीचा योग्य उपयोग •

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट