उपक्रम व त्याचा उद्देश समजून घेतला. त्याबद्दल दिवाकर भाऊचे मनापासून आभार👏
✍️ दिवाकर मानगुळधे, चंद्रपूर
👍👍👍
- ब्राईटेज फाऊंडेशन (मॅजिक) चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
पहिल्यांदाच जे जे उपक्रम राबवित आहे ते वास्तविकतेला धरुन आहे. अशा हितकारक उपक्रमामुळे उत्साह आणि मनोबल वाढायला स्वाभाविक आयुष्याच्या जडणघडणीत मोलाची ठरेल यात शंका नाही. ब्राईटेज हि समाज सेवाभावी संस्था त्यांच्या नावारुप काम करीत आहे. हे खास उल्लेखनीय आहे. असे काम फक्त हित साधणारी मानसेच करु शकतात. नाहीतर आज स्वार्थाने जिकडे तिकडे सर्वच पोखरलेले असतानाही. आपणही काही समाजाचे देणे आहे या शुध्द भावनेने जे आज ब्राईटेज काम करीत आहे. ते कौतुकास्पद आहे. या एक दोन महिण्यापासुन अंमलात आणलेल्या संकल्पना म्हणजे कानुन, साहस, अंकुर यामध्ये आपण आज काय करु शकतो यापेक्षा भविष्यात घडणाऱ्या प्रसंगात कसे टिकाव धरू शकतो हे प्रामुख्याने सांगण्याचा किवा शिकवण्याचा जो एक अर्थ या संकल्पनेत दडलेला आहे, असे मला वाटते. कानुन म्हणजे कायदा हा सर्वाच्या शिक्षणाचा विषय नसला तरी तो समाजाच्या जाग्रृतेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करुन या कायद्याचे महत्व किती मोठे आहे हे बिगरलाॅच्याही समाज बांधवांना पटवुन दिले आणि त्याचे मनोबल वाढविले. हेही अशक्य काम शक्य करुन दाखविले. यांने नक्कीच त्या व्यक्तीमध्ये वा समाजबांधवामध्ये एखाद्या कार्यालयात किवा सार्वजनिक जिवणात पुढच्या व्यक्तीला कामास विलंब का ? अडले कोठे ? मनण्याचे धाडस निर्मान होईल व बिना झीझक त्या अधिकार्याला काम करण्यास बाध्य करेल यात शंका नाही. साहस सारख्या उपक्रमाची महिलाना / पुरुषाना नितांत आवश्यकता आहे. या उपक्रमाचे सुध्दा आपण आयोजन केलेत आणि हा सुध्दा उपक्रम तुम्ही मोठ्या कष्टाने परिश्रमाने यशस्वी करुन दाखवला. या मधुन तुम्ही दाखवुन दिले की अत्याचाराला बळी पडण्यापेक्षा आत्म सुरक्षा कशी करायची प्रसंगावधान कसे राहायचे. शक्ती पेक्षा युक्ती बरी मनतात ना. या मधुन तंतोतंत खरे दिसते. महिलांनी अबला बनुन कोणीतरी वाचवेल या भ्रामक कल्पनेत न राहता आपण किती सक्षम आहोत. या साहसच्या माध्यमातुन दाखवुन दिले. प्रसंगावधान राखणे आणि संकटाचा सामना करणे, ईतके मनोबल उंचावण्यास तरी या साहसचा नक्कीच आमच्या माय बहिणाना याचा उपयोग होईल. अंकुर संकल्पनाच नाही तर समाज जडणघडणीचा एक पिलर आहे. या पिलरला मजबुत करण्याचे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच नाही तर ती एक जबाबदारी आहे. आजचे हे अंकुर ऊद्याला व्रृक्ष कसे बनेल ? यांचे भान प्रत्येक पालकांनीच नाही तर समाजबांधवानी घ्यायला हवे. व्रृक्ष सरळ वाढणारा हवा की फांद्या करणारा हे या अंकुरावरुन ठरत असले तरी त्या फांद्या वाढवण्याचे काम सर्वाचेच आहे असे मला वाटते. (सरळ म्हणजे स्वार्थ बाळगणारा सावली नसलेला,फांद्या असणारा म्हणजे सावली देणारा उपयोगी पडणारा या अर्थि) आज या अंकुरा ला एक मार्ग मिळेल, मला कसे वाढायचे ? आणि या मार्गदर्शनातुनच एक अनोखी जिद्द घेऊनच आपला मार्ग शोधण्याचे बाळकडू म्हणजेच अंकुर ठरेल यात शंका नाही. असेच या ब्राईटेज सेवाभावी संस्थेचे अंकुरातुन वटव्रृक्ष होवो, अशी या उपक्रमाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लिहिण्यात कोणत्या चुका झाल्या असेल तर क्षमा मागतो.
✍️_ दिवाकर मानगुळधे, चंद्रपूर _✍️
|